पत्रकारांनी जांभेकरांच्या लेखणीचा वसा पुढे चालू ठेवावा – पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड
बाळशास्त्री जांभेकर यांना वयाच्या विसाव्या वर्षी खुप मोठी जाण होती समाजाची सेवा करण्यासाठी समाजातील अनिष्ट चालीरीती बंद करण्यासाठी मराठी व इंग्रजी भाषेत सुरू केले. मराठी भाषा महाराष्ट्रातील जनतेला कळण्यासाठी तर भारतातील अनिष्ट चालीरीती इंग्रजांना कळण्यासाठी दोन्ही भाषेत लिखाण केले. आजही बाळशास्त्री जांभेकर यांचे कार्य खुपच महत्त्वाचे आहे. त्यामुळे पत्रकारांनी जांभेकरांच्या लेखणीचा वसा पुढे चालू ठेवावा असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड म्हणाले की, जामखेड पोलीसांनी वर्षभरात जे चांगले काम केले आहे त्यात पत्रकारांचा मोलाचा वाटा आहे. आमचे काम समाजापर्यंत नेण्यासाठी पत्रकार नेहमीच तत्पर असतात. त्यामुळे एक वर्षाचा कालखंड खुपच झटपट निघून गेला.पोलीस व पत्रकार यांच्यातील ताणतणाव कमी करण्यासाठी पोलीस व पत्रकारांनी एकत्र बसून विचारविनिमय करणे आवश्यक आहे. यातून विचाराची देवाणघेवाण होण्यास मदत होते. जामखेड मधील सर्वच पत्रकार खुपच सकारात्मक आहेत असेही गायकवाड यांनी सांगितले.पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण व दिपक देवमाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लियाकत शेख यांनी केले