श्रीगोंद्यात धक्कादायक आंदोलन!
स्मशानभूमीतच नागरिकांचे आमरण उपोषण “पाणी नाही, स्मशानभूमी नाही… आता जगायचं कसं?”
श्रीगोंद्यात धक्कादायक आंदोलन!
स्मशानभूमीतच नागरिकांचे आमरण उपोषण 
“पाणी नाही, स्मशानभूमी नाही… आता जगायचं कसं?”
श्रीगोंदा | पोलीस न्यूज नेटवर्क
तालुक्यातील अजनूज गावात प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप फुटला! 
स्मशानभूमीची जागा वादग्रस्त, पिण्याच्या पाण्याची योजना बंद – या दोन ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी थेट स्मशानभूमीत आमरण उपोषण सुरू केलं.
नागरिकांची आक्रोशपूर्ण हाक
- स्मशानभूमीसाठी निधी आला पण जागेचा गोंधळ अजूनही कायम
![⚠️]()
- ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत पाणी योजना गेल्या वर्षभरापासून ठप्प
![🚱]()
- विहिरीवर ट्रान्सफॉर्मर नाही, त्यामुळे थेंबभर पाणी नाही
![💧]()
“माणूस मेल्यावर स्वर्गात जातो म्हणतात… पण अजनूजमध्ये मृतदेहांनाही नरकयातना भोगाव्या लागतायत!” – ग्रामस्थांचा संताप.
उपोषणाची ठिकाणं = स्मशानभूमीच!
१८ ऑगस्ट रोजी वळणेश्वर मंदिरासमोरील स्मशानभूमीत उपोषण सुरू.
यात सोसायटी चेअरमन राजेंद्र गिरमकर, उपसरपंच विशाल कवडे, सरपंचपती योगेश गिरमकर आणि गावातील अनेक नागरिक सहभागी.
राजकीय दखल
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी उपोषणस्थळी भेट देऊन प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. पण ग्रामस्थांचा सवाल कायम –
“आश्वासनं किती दिवस? समाधान कधी मिळणार?”

नागरिकांची आक्रोशपूर्ण हाक


उपोषणाची ठिकाणं = स्मशानभूमीच!
राजकीय दखल