अहमदनगर
दीड महिन्यापासून बंद असलेला कोठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य भाजीपाला विभाग मंगळवार दि.1 जून पासून पुर्ववत सुरू करण्याची मागणी अहमदनगर भाजीपाला, फळफळावळ आडत्यांचे असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे. सदर मुख्य भाजीपाला विभाग सुरु न केल्यास आयुक्तांच्या दालनात उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे यांनी दिली.
हे अवश्य पहा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा
