पुण्यातील 23 गावांचं नशीब फळफळलं!

प्रत्येक गावाला 5 कोटींचा निधी – आता खऱ्या अर्थानं विकास होणार!

📢
पुण्यातील 23 गावांचं नशीब फळफळलं! 🚀 प्रत्येक गावाला 5 कोटींचा निधी – आता खऱ्या अर्थानं विकास होणार!

पुणे महापालिकेत काही वर्षांपूर्वी विलीन झालेली फुरसुंगी, उरुळी देवाची आणि आणखी २१ गावे आता त्यांच्या विकासासाठी एक महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलं आहे.

🔷 महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय:
या २३ गावांसाठी प्रत्येकी ₹५ कोटींचा निधी, म्हणजे एकूण ₹११५ कोटींचा विकासनिधी मंजूर!

📌 कशासाठी वापर होणार हा निधी?

  • रस्ते व गटार व्यवस्था
  • पाणीपुरवठा
  • कचरा व्यवस्थापन
  • इतर मूलभूत सोयी

⏩ यामुळे वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या भागांमध्ये खऱ्या अर्थानं विकासाच्या गतीला चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे ही गावे आता स्वतंत्र नगरपरिषद म्हणून कार्यरत आहेत.

👥 बैठकीत कोण होते?

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • खासदार मेधा कुलकर्णी
  • वरिष्ठ प्रशासन अधिकारी, नगरविकास सचिव, जिल्हाधिकारी इ.

🛑 महत्त्वाचे निर्णय:

  • आंबेगाव बुद्रुकमधील कचरा डेपो समस्या – शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया व गांडूळखत निर्मिती
  • जांभूळवाडी तलाव – पाण्यासाठी वापर, पण गुणवत्ता तपासून
  • मालमत्ता कर माफ करण्याची योजना
  • 626 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याची शक्यता