कर्जत-जामखेडच्या ६ गावांना मिळाला विकासाचा बूस्ट!
प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश – १.५ कोटींचा निधी मंजूर

प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश – १.५ कोटींचा निधी मंजूर
कर्जत व जामखेड तालुक्यातील भांबोरा, सिध्दटेक, गुरव पिंपरी, हळगाव, साकत आणि अरणगाव या सहा ग्रामपंचायतींसाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानातून प्रत्येकी २५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
यामध्ये २० लाख ग्रामपंचायत इमारतीसाठी
५ लाख नागरी सुविधा केंद्रासाठी मिळणार आहेत.
या निधीसाठी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि त्याला अखेर यश मिळालं आहे.
नागरी सुविधा केंद्रांमधून मिळणार सेवा:
आधार कार्ड अपडेट
बँकिंग सेवा
उत्पन्न/निवासी दाखले
उज्ज्वला योजना, पीएम किसान, पेंशन योजना व इतर सेवा
यामुळे गावातच मिळणार डिजिटल सेवा, आणि नागरिकांना होणार मोठा फायदा!
शिंदे म्हणाले, “गाव पातळीवर स्मार्ट सेवा देणं हे माझं ध्येय आहे. केंद्र व राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य करून गावांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे.”
जि.प. आणि पं.स. निवडणुकांच्या तोंडावर प्रा. राम शिंदे यांनी खेचून आणलेल्या निधीमुळे गावागावात उत्साहाचं वातावरण आहे!
कार्यकर्त्यांमध्ये जोश वाढलाय, आणि सामान्य नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.
‘स्मार्ट ग्रामपंचायत’ ही केवळ कल्पना न राहता, प्रत्यक्षात उतरते आहे – कर्जत-जामखेडच्या गावांमध्ये!