करोडोंचा पूल 5 वर्षांतच कोसळला! ठेकेदारावर गुन्हा दाखल
कर्जत तालुक्यातील शिंगोरी येथील नांदणी नदीवर कोट्यवधींचा खर्च करून बांधलेला पूल 50 वर्षे टिकेल असा दावा होता… पण

कर्जत तालुक्यातील शिंगोरी येथील नांदणी नदीवर कोट्यवधींचा खर्च करून बांधलेला पूल 50 वर्षे टिकेल असा दावा होता… पण प्रत्यक्षात तो फक्त 5 वर्षांतच धुळीस मिळाला!
या घटनेने शासनाचा निधी पाण्यात गेला आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. आता या प्रकरणी बजरंगबली कन्स्ट्रक्शन, थेरवडी चे संचालक मोहन दामोदर गोडसे यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. 
पार्श्वभूमी
- 2009 मध्ये पुलासाठी प्रशासकीय मान्यता
![✅]()
- 2012 मध्ये काम सुरू, सप्टेंबर 2012 ला पूर्ण दाखवले
![📆]()
- एकूण खर्च: ₹1 कोटी 39 लाख 70 हजार
![💰]()
- 20 जुलै 2020 रोजी पूर्णत्वाचा अहवाल
![📝]()
- दावा: “हा पूल 50 वर्षे टिकेल!”
![🏗️]()
पण… प्रत्यक्ष पाहणीत निकृष्ट साहित्याचा वापर झाल्याचे उघड झाले. ठेकेदाराकडून मोठा निष्काळजीपणा झाल्याचेही स्पष्ट झाले. 
विधानसभेत गाजलेलं प्रकरण
हा शिंपोरा पूल कोसळल्याचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात जोरदार गाजला होता. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याची घोषणा केली होती आणि पुढील कायदेशीर कारवाईचे संकेत दिले होते. अखेर, त्यानुसार कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे.
तक्रारदार व तपास
करमाळा उजनी प्रकल्प पुनर्वसन उपविभागीय अधिकारी मंजूनाथ तुंबळ यांच्या तक्रारीवरून गोडसे यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप वसावे करत आहेत. 
सोशल मीडियावर चर्चा
या प्रकरणामुळे लोकांमध्ये संतापाचा भडका उडाला आहे. “50 वर्षांचा दावा करताना हे लोक इतके आत्मविश्वासात होते, पण काम फक्त 5 वर्षेच टिकले!” अशा प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत. काहींनी तर याला ‘करोडोंचा घोटाळा’ असेच नाव दिले आहे. 
संदेश स्पष्ट आहे – करदात्यांचा पैसा वाया घालवणाऱ्या निकृष्ट कामांना आता माफी नाही. जनतेला उत्तर द्यावेच लागेल!
#ShingoraBridge #KarjatNews #CorruptionAlert #MetroPortal #BreakingNews 





