पावसाचा कहर! भगवानगड परिसरातील शेती उध्वस्त
शेतकऱ्यांचा संताप उसळला ![🚨]()
![🌾]()
“पिकं गेली, संसार उध्वस्त झाला… पण आमच्या व्यथा ऐकायला कोणी नाही!” असा आक्रोश सध्या भगवानगड परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आहे.
पाथर्डी तालुक्यातील वास्तव
गेल्या चार-पाच दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे भगवानगड परिसरातील मालेवाडी, ढाकणवाडी, जवळवाडी, भारजवाडी, कीर्तनवाडी, खरवंडी कासार, काटेवाडी, तुळजवाडी, येळी, बडेवाडी, भालगाव या गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतांमध्ये पाणीच पाणी भरून राहिले असून कापूस, उडीद, ऊस, बाजरी यांसारखी पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या घरातही पाणी शिरल्याने संसार उद्ध्वस्त झाला आहे.
महामार्ग धोकादायक
लोहा–कंधार राष्ट्रीय महामार्ग (361 F) वरील खरवंडी कासार ते भालगाव श्रीपतवाडी भागातील पुलाला भगदाड पडले आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे की हे निकृष्ट कामाचे फलित आहे. त्यामुळे वाहतूक धोक्यात आली असून हा रस्ता पूर्णपणे अपघातप्रवण बनला आहे.
शेतकऱ्यांचा आक्रोश
भगवानगड परिसर हा ऊसतोड मजुरांचा पट्टा म्हणून ओळखला जातो. इथल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक वाहून गेल्यामुळे मोठे संकट ओढवले आहे.
शेतकऱ्यांचा सवाल स्पष्ट आहे ![⤵️]()
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करंजी, तिसगाव, हनुमान टाकळी परिसराची पाहणी केली,
मात्र भगवानगड परिसराकडे त्यांनी पाठ फिरवली.
खासदार निलेश लंके आणि आमदार मोनिका राजळे यांनीही या भागातील शेतकऱ्यांना भेट देणे टाळले.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक मागण्या
ग्रामपंचायत सदस्या शुभांगी अजिनाथ कीर्तने यांनी प्रशासनाकडे तातडीने खालील मागण्या केल्या आहेत:
-
सर्व नुकसानग्रस्त गावांचा पंचनामा करावा. -
शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत द्यावी. -
मालेवाडीतील पवळागड वस्ती रस्ता जो पूर्ण वाहून गेला आहे, त्याची तातडीने दुरुस्ती करावी. -
प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना आधार द्यावा.


“पिकं गेली, संसार उध्वस्त झाला… पण आमच्या व्यथा ऐकायला कोणी नाही!” असा आक्रोश सध्या भगवानगड परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आहे.
पाथर्डी तालुक्यातील वास्तव
शेतांमध्ये पाणीच पाणी भरून राहिले असून कापूस, उडीद, ऊस, बाजरी यांसारखी पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या घरातही पाणी शिरल्याने संसार उद्ध्वस्त झाला आहे.
महामार्ग धोकादायक
शेतकऱ्यांचा आक्रोश
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करंजी, तिसगाव, हनुमान टाकळी परिसराची पाहणी केली,
यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक मागण्या
सर्व नुकसानग्रस्त गावांचा पंचनामा करावा.
सोशल मीडियावर संतापाचा ज्वालामुखी
इंटरनेटवर धडाक्यात व्हायरल होत आहेत.
नेटिझन्सनीही #SaveFarmers #BhagwangadFloods #MetroPortal अशा हॅशटॅगसह प्रशासनावर नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे.
Metro News Portal चा स्पष्ट संदेश: