दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन

केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 26 मार्चला भारत बंदची हाक

अहमदनगर (प्रतिनिधी)- दिर्घकाळापासून दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला चार महिने पुर्ण होत असताना शुक्रवार दि. 26 मार्च रोजी भारत बंद हाक देण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्हा शेतकरी कामगार संयुक्त समिती व जन आंदोलनाच्या संघर्ष समिती या भारत बंद मध्ये सहभागी होणार आहे. तर मंगळवार दि.23 मार्च रोजी शहीद दिनी हुतात्म्यांना अभिवादन करुन मोदी सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार आहे. तसेच रविवार दि.28 मार्च रोजी होळीनिमित्त शेतकरी विरोधी कायदे, कामगार विरोधी चार संहिता व विज विधेयक 2020 ची होळी करण्यात येणार असल्याचे हमाल पंचायत येथे झालेल्या बैठकित निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे यांनी दिली.

Also see this and subscribe 

 

दिल्ली भारतीय महिला फेडरेशन अध्यक्षा कॉ. स्मिता पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकिसाठी हमाल पंचायतचे अध्यक्ष तथा मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष अविनाश घुले, अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, किसान सभेचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य अ‍ॅड. बन्सी सातपुते, कॉ. महेबुब सय्यद, आयटकचे अ‍ॅड. सुधीर टोकेकर, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे रामदास वागस्कर, कामगार संघटना महासंघाचे कॉ. भैरवनाथ वाकळे, सरकारी कर्मचारी नेते रावसाहेब निमसे, आर्किटेक्ट अर्शद शेख, युथ फेडरेशनचे शहराध्यक्ष फिरोज शेख, सतिश पवार, भाऊसाहेब थोटे, दिपक शिरसाठ, कार्तिक पासलकर आदी उपस्थित होते.

 

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास दि.26 मार्चला चार महिने पूर्ण होत आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या आडमुठ्या व शेतकरी कामगार जनसामान्यांच्या विरोधी धोरणामुळे दिर्घकाळ चाललेल्या देशातील पाचशेच्यावर शेतकरी संघटनांनी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु ठेवले आहे. या आंदोलनात आतापर्यंत 250 च्यावर शेतकरी आंदोलक मृत्युमुखी पडले आहेत. भाजप वगळता सर्व पक्ष व जनसंघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिलेला आहे.

दिल्ली  शेतकरी आंदोलनास पाठबळ देण्यासाठी दि.26 मार्च रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंद मध्ये अहमदनगर जिल्हा शेतकरी कामगार संयुक्त समिती उतरणार असल्याचे बैठकित निर्णय घेण्यात आला. तसेच मंगळवार दि.23 मार्च रोजी शहीद दिनी पत्रकार चौकातील शहिद भगतसिंग स्मारक येथे शहिद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन करुन मोदी सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार आहे. तर दि.28 मार्चला होळीला शेतकरी विरोधी कायदे, कामगार विरोधी चार संहिता व विज विधेयक 2020 ची होळी केली जाणार आहे. या आंदोलनात सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी.

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.