‘साईकृपा २” व “तनपुरे” चे अपिल फेटाळले 

साखर  आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासमोर सुनावणी 

अहमदनगर : श्रीगोंदे तालुक्यातील साईकृपा फेज २ आणि राहुरी तालुक्यातील डॉ. तनपुरे साखर कारखान्यांना गाळप परवाना नाकारल्यानंतर त्यांनी पुन्हा अपील केले होते. साखर  आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासमोर त्यावर सुनावणी  झाली. सुनावणीनंतर त्यांचे अपील फेटाळण्यात आले. याबाबाबत सोमवारी आयुक्तांचे  पत्र विभागीय सहसंचालक कार्यालयात प्राप्त झाले. त्यानंतर संबंधित कारखान्यांना कळविण्यात आले आहे, असे प्रादेशिक साखर सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी सांगितले.

Also see this and subscribe 

शेतकऱ्यांनी थकीत एफआरपीची रक्कम अदा न केल्याने साखर आयुक्त कार्यालयाने साईकृपा फेज २ आणि राहुरी तालुक्यातील डॉ. तनपुरे साखर कारखान्याचा गाळप परवाना नाकारण्यात आला होता. या निर्णयाविरुद्ध दोन्ही कारखान्यांनी सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासमोर अपील केले होते. त्यांच्यासमोर सुनावणी झाली. डॉ. तनपुरे साखर  कारखान्यांच्या वतीने युक्तिवाद करताना शेतकऱ्यांची थकीत देणी लवकरच अदा करू, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु देणी दिल्याशिवाय चालू हंगामातील परवाना देता येत नसल्याने साखर आयुक्तांनी  दोन्ही  कारखान्यांचे अपील फेटाळून लावले. त्यामुळे दोन्ही कारखान्यांना चालू गळीत हंगामातील गाळप परवाना मिळू शकला नाही. 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.