“व्यवस्थेने एवढं छळलं की शेवटी मृत्यूला कवटाळावं लागलं…”

 हर्षल पाटील यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर राहुरीत उठलेल्या फलकाने सर्वांचे लक्ष वेधले!

🕯️
 “व्यवस्थेने एवढं छळलं की शेवटी मृत्यूला कवटाळावं लागलं…”
✍️ हर्षल पाटील यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर राहुरीत उठलेल्या फलकाने सर्वांचे लक्ष वेधले!

📍 राहुरी (अहिल्यानगर) – सरकारी काम करूनही मेहनतीचे पैसे न मिळाल्याने जीव गमावलेल्या सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर आता बिल्डिंग क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.

🏗️ बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया – अहिल्यानगर सेंटर यांनी राहुरी शहरातील नगर-मनमाड रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (PWD) कार्यालयासमोर एक भावनिक फलक लावून सिस्टमवरील रोष व्यक्त केला आहे.

🖼️ फलकावरील मजकूर ठसठशीत आणि खोल परिणाम करणारा:
👉 “ही आत्महत्या नाही… भिकेला लागलेल्या अर्थव्यवस्थेचा बळी आहे!”
👉 “सरकारी काम करूनही महिनोमहिने पैसे थकवले गेले… व्यवस्थेने एवढा छळ केला की आत्महत्या हा पर्याय वाटू लागला!”

💬 या फलकामुळे नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरु झाली आहे. कोणताही युवा उद्योजक, कामगार किंवा कंत्राटदार अशा स्थितीत पोहोचू नये, यासाठी शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे.

📢 या घटनेनंतर पुढील प्रश्न उभे ठाकलेत:
▪️ का इतक्या दिवसांनीही देयके दिली जात नाहीत?
▪️ का सरकारी खात्यांचे व्यवहार एवढे ढिसाळ आणि अकार्यक्षम आहेत?
▪️ आणि मुख्य म्हणजे – एखादा तरुण फक्त वेळेवर पैसे न मिळाल्यामुळे स्वतःचं आयुष्य संपवत असेल, तर ही व्यवस्थाच कुठे अपयशी नाही का?

 

🔴 बिल्डर्स असोसिएशनने दिलेला हा फलक फक्त श्रद्धांजली नाही, तर व्यवस्थेला दिलेला एक थेट इशाराच आहे.