“ज्यात विखेंनी 5 वर्ष घेतलं, ते लंके यांनी एका वर्षात करून दाखवलं!”
राष्ट्रवादीचे सुहास कासार यांचा थेट हल्ला
“ज्यात विखेंनी 5 वर्ष घेतलं, ते लंके यांनी एका वर्षात करून दाखवलं!” — राष्ट्रवादीचे सुहास कासार यांचा थेट हल्ला
अहिल्यानगर | मेट्रो न्यूज |
नगर–पुणे रेल्वे मार्ग, नगर–मनमाड रस्ता, वैद्यकीय महाविद्यालय, आणि पूरग्रस्त मदत — या सर्व मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास कासार यांनी माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर जोरदार टीका करताना, “श्रेय मिळवायला उशीर झालाय, काम आधी व्हायला हवं होतं!” असा सणसणीत टोला लगावला आहे.
रेल्वे मार्गाचं श्रेय कोणाचं?
नगर–पुणे रेल्वेमार्गासाठी डीपीआर सादर होताच माजी खासदारांच्या समर्थकांनी श्रेय घेतलं, पण सुहास कासार म्हणतात,
“जर पाच वर्षे पाठपुरावा चालू होता, तर मंजुरी का मिळाली नाही?”
खा. नीलेश लंके यांच्या एकाच वर्षाच्या प्रयत्नांमुळेच हा प्रकल्प मार्गी लागला आहे.
रस्त्यांचं काम रखडलं कुणामुळे?
नगर–मनमाड आणि अकर-अजमाड रस्त्यांचे काम विखेंच्या काळात रखडलेलं होतं, पण लंके यांच्या सक्रिय पाठपुराव्यामुळे आता हे कामं वेगात सुरू आहेत, असंही कासार यांनी ठणकावून सांगितलं.
अतिवृष्टीत कोण उभं राहिलं?
मे महिन्यात वाळकी परिसरात पुरामुळे प्रचंड नुकसान झालं. त्या वेळी
“विखे परदेशात होते का?”
असा थेट सवाल करत कासार म्हणतात —
लंके यांनी स्वतः आरोग्य केंद्रातील गाळ काढला, पूल बांधले, मदत पोहोचवली!
वैद्यकीय महाविद्यालय कुणाच्या जोरावर?
खा. लंके यांनी संसदेत नगर जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाची जोरदार मागणी केली आणि त्यानंतरच मंजुरी मिळाली.
कासार म्हणतात —
“विखेंच्या काळात हे का शक्य झालं नाही?”
शिर्डीला हलवण्याचं षड्यंत्रही लंके यांनी हाणून पाडलं!
कासार यांचा स्पष्ट सवाल:
“काम कुणी केलं, श्रेय त्यांचं हवं! उशिरा उठून ‘मीच केलं’ म्हणणं हास्यास्पद आहे.“
#NileshLanke #SujayVikhe #RailwayPolitics #MedicalCollegeForNagar #LankeVikheShowdown #MetroNewsExclusive
पोस्ट शेअर करा – सत्य जास्त काळ दडपता येत नाही, काम बोललं पाहिजे!

रेल्वे मार्गाचं श्रेय कोणाचं?
रस्त्यांचं काम रखडलं कुणामुळे?
अतिवृष्टीत कोण उभं राहिलं?
वैद्यकीय महाविद्यालय कुणाच्या जोरावर?
कासार यांचा स्पष्ट सवाल: