पावसाचा धमाका! दारणा, गंगापूर धरणं तुडुंब भरली

पावसाचा धमाका! दारणा, गंगापूर धरणं तुडुंब भरली, गोदावरीला नवीन जीव!

🌧️ पावसाचा धमाका! दारणा, गंगापूर धरणं तुडुंब भरली, गोदावरीला नवीन जीव! 🌊

उत्तर महाराष्ट्रातला पाऊस अखेर जोर धरू लागला आणि त्याचा परिणाम दिसू लागला आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर गेले २४ तास म्हणजेच आज सकाळी ६ पर्यंत तब्बल १५० मिमी पाऊस पडला. यामुळे दारणा आणि गंगापूर धरणं तुडुंब भरली आहेत आणि गोदावरी नदीचा पुरगंगा अवतार झाला आहे.

👉 दारणा धरण (क्षमता : ७ टीएमसी) दुपारी दीडच्या सुमारास भरलं आणि लगेच ११०० क्युसेक वेगाने पाणी नदीत सोडण्यात आलं.
👉 गंगापूर धरण आता ५०% क्षमतेवर आहे आणि उद्या सकाळी ९ च्या सुमारास ओव्हरफ्लोचं पाणी सोडलं जाणार आहे.
👉 मुकणे धरणात यंदा लवकरच २.५ टीएमसी पाणी साठलं आहे.
👉 भंडारदरा २०% वरून ३०% आणि निळवंडे ३२% पाणीसाठा गाठलं आहे.

🌱 उसाच्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर!
गोदावरी कालव्यात आधीच ओव्हरफ्लोचं पाणी वाहत होतं, आता धरणातून ओव्हरफ्लो सुरू झाल्यानं पुढील १५-२० दिवस कालवे भरून वाहतील. पावसाची साथ राहिली तर हा कालावधी थेट २-२.५ महिने वाढू शकतो.
याचा फायदा राहाता, कोपरगाव तालुक्यातील विहिरींना होईल आणि साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस लागवडीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे –

 

🔹 संजीवनी
🔹 कोळपेवाडी
🔹 गणेश
🔹 संगमनेर
🔹 प्रवरा
🔹 अशोक
🔹 ज्ञानेश्वर
🔹 वृद्धेश्वर
🔹 मुळा

💬 १५ ऑगस्टच्या आतच धरणं पूर्ण भरण्याची शक्यता आहे, त्यामुळे साखर उद्योगासाठी आणि शेतकऱ्यांसाठी यंदाचं पावसाळं भरपूर आशा घेऊन आलं आहे.

📸पावसाच्या या दमदार हजेरीने #FeelGood व्हायचंच!