तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार उज्वल भवितव्यासाठी दिशादर्शक – किरण काळे

काँग्रेसच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांचे विचार आजही समाजाला एकविसाव्या शतकात देखील तेवढेच प्रेरणादायी आहेत. आजच्या तरुण पिढीला उज्वल भवितव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे दिशादर्शक असल्याचे, प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.

शिवजयंती निमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच पक्षाच्या सर्व फ्रंटलच्या वतीने छत्रपति शिवाजी महाराजांच्या एसटी स्टँड येथील अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. त्यावेळी काळे बोलत होते. यावेळी जय भवानी, जय शिवाजीच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने सर्व परिसर यावेळी दणाणून गेला होता.

यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, खलील सय्यद, दशरथ शिंदे, अनंतराव गारदे, प्रविण गीते, निजाम जहागीरदार, अनिस चुडीवाल, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, अन्वर सय्यद, विशाल घोलप ओम नऱ्हे, आकाश बारस्कर, उषा भगत, जरीना पठाण, राणी पंडित, शारदाताई वाघमारे, हेमलता घाडगे, अमृता कानडे, बिबीशन चव्हाण, प्रशांत जाधव, नाथा अल्हाट, संजय भिंगारदिवे, प्रमोद डांगे, गणेश आपरे, गौरव घोरपडे, सागर चाबुकस्वार, मोहनराव वाखुरे, ॲड.सुरेश सोरटे, सागर ईरमल, अजय मिसाळ, शंकर आव्हाड, विकी करोलिया, हर्षल काकडे, विनोद दिवटे आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना काळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील सर्व जाती धर्माच्या समाज घटकांना एका समान धाग्यात गुंफण्याच काम केलं. रयतेसाठी कल्याणकारी स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांचे हेच विचार समाजाला आजही प्रेरणादायी असून तरुण पिढीने या विचारांचे अनुकरण मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे.

नगर शहरामध्ये काँग्रेस कार्यकर्ते काम करत असताना महाराजांच्या लोकांच्या सेवेच्या कामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करत असतात. हे काम करताना सर्व समाज घटकांना बरोबर घेत काम करण्याची भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांची नेहमी असते, असे यावेळी काळे म्हणाले.