संगमनेरमध्ये फलक छेडछाड प्रकरणावरून संतापाचा भडका!

 बाळासाहेब थोरात यांच्या शुभेच्छा फलकावर समाजकंटकांचा घाणेरडा हात – काँग्रेसचा राग अनावर!

🚨
 संगमनेरमध्ये फलक छेडछाड प्रकरणावरून संतापाचा भडका!
🛑 बाळासाहेब थोरात यांच्या शुभेच्छा फलकावर समाजकंटकांचा घाणेरडा हात – काँग्रेसचा राग अनावर!

संगमनेर | पोलीस न्यूज नेटवर्क

सुसंस्कृत आणि शांत संगमनेरचं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरूच…
वडगाव पान टोलनाक्याजवळ लावण्यात आलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे व डॉ. जयश्री थोरात यांच्या श्रावण शुभेच्छा फलकाची छेडछाड झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे! ⚠️

🎯 “विकृत प्रवृत्ती वेळीच ठेचा नाही दिली, तर रस्ता रोको अटळ!”
– असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

🗣️ बाळासाहेब गायकवाड (तालुका काँग्रेस उपाध्यक्ष) यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत म्हटलं:

“संगमनेरची शांतता, समृद्धी आणि संस्कृती डागळवण्याचा डाव सुरू आहे. जातीभेद पसरवून गावात तेढ निर्माण केली जात आहे.”

📲 ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली, आणि नेटकऱ्यांकडून जोरदार निषेध व्यक्त होत आहे.
🔥 “फलकावर हात ठेवणाऱ्यांचे हात प्रशासनाने आता धरणं गरजेचं आहे!” – असं नेटिझन्स म्हणतायत.


🛑 जर कारवाई झाली नाही तर काय होणार?
🎤 निलेश थोरात यांनी स्पष्ट इशारा दिला:

“२ दिवसांत गुन्हेगार अटकेत न घेतल्यास, भव्य रस्ता रोको आंदोलन होईल आणि याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील!”

👥 घटनास्थळी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔊 इंद्रजीत भाऊ थोरात यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं, पण संताप अजून शमलेला नाही.


📌 सांगायचं म्हणजे – संगमनेरचा संयम संपत चाललाय!
प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर हा मुद्दा केवळ तालुक्यापुरता राहणार नाही – तो राज्यभर धगधगेल, हे निश्चित!

 

📲 या प्रकरणावर तुमचं काय मत आहे?
🗯️ कमेंट करा,
🔁 ही पोस्ट शेअर करा
आणि
📢 आवाज उठवा – शांततेच्या नावाने फलक फाडणाऱ्यांना थारा नको!