Breaking News | अहिल्यानगरमध्ये रिपब्लिकन पक्षाचा संताप!
अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा कायद्याच्या रक्षणकर्त्यांना जागं करणारी घटना घडली आहे.
Breaking News | अहिल्यानगरमध्ये रिपब्लिकन पक्षाचा संताप! ![🔥]()
अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा कायद्याच्या रक्षणकर्त्यांना जागं करणारी घटना घडली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून धडक दिली आणि तात्काळ कारवाईची मागणी केली.
मागणी एकच:
-
जिल्हाध्यक्ष **सुनील साळवे यांच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याच्या आरोपींवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई व्हावी!
![⚖️]()
-
साळवे कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण द्या!
![👮♂️]()
मोर्चामध्ये राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजयराव साळवे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. ![✊]()
हल्ल्याचा पार्श्वभूमी:
जामखेड तालुक्यातील नानज गावात गुंडांची टोळी अनेक दिवसांपासून दहशत निर्माण करत होती.
खंडणी उकळणे, नागरिकांना मारहाण करणे, दुकानदारांना त्रास देणे अशा गंभीर गुन्ह्यात ही टोळी सामील आहे. याच टोळीतील गुंडांनी 29 जून रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. त्यावेळी साळवे यांनी गाव बंद आंदोलन उभारले होते.
याचाच बदला म्हणून या टोळीने सुनील साळवे यांच्या कुटुंबीयांवर तलवार, कोयते आणि लोखंडी रॉडसह जीवघेणा हल्ला केला. ![😡]()
या हल्ल्यात यशदीप साळवे, रतन साळवे, आदेश साळवे, रेश्मा साळवे गंभीर जखमी झाले, तर दिग्विजय सोनवणे यांनाही मारहाण झाली. अभिजीत साळवे यांच्यावर तर तब्बल 15-16 वार करून त्यांना बेशुद्ध होईपर्यंत मारले गेले! ![💔]()
मोर्चातील मागण्या:
-
आरोपींवर MCOCA लावा
-
घटनेचा सूत्रधार कोण हे शोधा
-
आरोपींचे कॉल डिटेल्स तपासा
-
केस फास्टट्रॅक कोर्टात चालवा
-
सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्या

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून धडक दिली आणि तात्काळ कारवाईची मागणी केली.
मागणी एकच:


हल्ल्याचा पार्श्वभूमी:
खंडणी उकळणे, नागरिकांना मारहाण करणे, दुकानदारांना त्रास देणे अशा गंभीर गुन्ह्यात ही टोळी सामील आहे. याच टोळीतील गुंडांनी 29 जून रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. त्यावेळी साळवे यांनी गाव बंद आंदोलन उभारले होते.

आरपीआयने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर तपासात हलगर्जीपणा झाला किंवा आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न झाला, तर पक्ष तीव्र आंदोलन करेल! 

