Big Update | ई-वाहनधारकांसाठी महाराष्ट्र सरकारची टोल फ्री गिफ्ट!
महाराष्ट्र सरकारने एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे!
Big Update | ई-वाहनधारकांसाठी महाराष्ट्र सरकारची टोल फ्री गिफ्ट! ![🚨]()

आता मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर ई-वाहनांना टोलमाफी मिळणार आहे. 

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील ई-वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुण्यातच आज १ लाखांपेक्षा जास्त ई-वाहने धावत आहेत. पण अलीकडे केंद्र सरकारने ई-वाहनांवरील सवलती कमी केल्यामुळे खरेदीत घट झाली होती. अशा वेळी हा टोल फ्री निर्णय ई-वाहन बाजाराला नवा बूस्टर ठरणार आहे. 
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे
तर मग, पेट्रोल-डिझेलवर खर्च न करता, प्रदूषण न करता आणि आता टोल फ्री सुविधा घेत रोड ट्रिपला निघायलाच हवं! 