छत्रपतींनी सदैव रयतेचा व शेतकऱ्यांचा हिताचा विचार केला : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नगर बाजार समितीच्यावतीने उत्साहात साजरी

नगर : छत्रपतींनी सदैव रयतेचा व शेतकऱ्यांचा हिताचा विचार केला. त्यांचा इतिहास
प्रेरणादायी व वैभवशाली आहे. शिवरायांनी शेतीविषय धोरण अवलंबून त्या अंमलता आणल्या.
त्यामुळे शिवकाळात अनेकदा दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्यांनी कधीच आत्महत्या केल्या नाहीत.
शेतकऱ्यांचे प्रश्‍न समजावून घेऊन ताबडतोब सोडविण्याचे काम केले. याचबरोबर सर्व समाजाला
एकत्रित करून रयतेचे राज्य निर्माण करून कारभार केला. त्यांचा इतिहास आजच्या समाजाला
प्रेरणादायी आहे. याचबरोबर युवकांसमोर एक आदर्श आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री
शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व
मार्केटयार्ड टेम्मो असोसिएशन वतीने मार्केटयार्डमधील छत्रपतींच्या अश्वरुढ पुतळ्यास पुष्पहार
अर्पण करुन अभिवादन करताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, समवेत सचिव अभय भिसे,
उपसचिव बाळासाहेब लबडे, जयसिंग भोर, सचिन सातपुते, मनोज कोतकर, टेम्पो चालक,
अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बाजार समितीच्यावतीने छत्रपतींच्या पुतळ्यास आकर्षक विद्युत रोषणाई
सजावट करून पारंपरिक पद्धतीने आकर्षक रांगोळी काढून नागरिकांचे लक्ष वेधले होते.

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.