भारतीय संविधान = रक्तपाताशिवाय क्रांती!
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज महाराष्ट्र विधिमंडळात थाटात सत्कार!


देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज महाराष्ट्र विधिमंडळात थाटात सत्कार!
“संविधानात एवढी ताकद आहे की रक्त न सांडता क्रांती घडू शकते,” – सरन्यायाधीश गवई यांचे सडेतोड वक्तव्य!
यावेळी त्यांनी न्याय, कायदे आणि कार्यकारी मंडळ यांनी संविधानाला जपल्याचा अभिमान व्यक्त केला.
“मी आजही संविधानाचा विद्यार्थी आहे,” असं नम्र पण ठामपणे त्यांनी सांगितलं.
सभागृहात उपस्थित मान्यवर:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदींच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक क्षण अनुभवला गेला.
भाडेपट्टा कायदा रद्द → लाखो गरिबांना मिळाल्या स्वतःच्या जमिनी
महार वतन उच्चाटन कायदा → दलितांना जमीनमालकी
वडिलांची आठवण काढत गवई म्हणाले, “माझ्या वडिलांचं विधिमंडळाशी ३० वर्षांचं नातं होतं. नागपूरच्या झोपडपट्टीत वकील म्हणून काम करताना न्यायासाठी संघर्ष केला.”
“हा क्षण ‘न भूतो न भविष्यति’ – असाच आहे!”