कुमार वाकळे यांनी विकासकामांतून नागरिकांचा विश्वास संपादन केला : आ. संग्राम जगताप

प्रभाग क्र. ७ मध्ये नंदनवन नगरमध्ये रस्ता कॉक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा

नगर : लोकशाही प्रणाली लोकप्रतिनिधींनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून नागरिकांचे प्रश्‍न मार्गी लावणे अपेक्षित आहे. असे
केले तर सामान्य जनता देखील लोकप्रतिनिधींचे जल्लोषात स्वागत करतात. नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी प्रभाग क्र. ७ मध्ये झालेल्याविकासकामांतून नागरिकांचा विश्वास संपादन केल्यामुळेच आज आमचे स्वागत फटाक्यांची आतिषबाजी, रांगोळी काढून फुलांचा वर्षाव वदीपोत्सव करून केले आहे. याबद्दल मी सर्व नागरिकांचे आभार मानतो. या भागातील झालेल्या कामांचा समाधान प्रत्येक नागरिक व्यक्त करीत होते. विकास हा शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम प्रत्येकाने केल्यास विकासाला चालना मिळते. पोलिस कॉलनी परिसरातील नंदनवन भागाच विकास कुमारसिंह वाकळे यांनी मार्गी लावल्याबद्दल मी त्यांचे कौतूक करतो, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी प्रभाग ७ मधील नंदनवन नगर, पोलिस कॉलनी अंतर्गत ओम साईराज, संत तुकाराम, संत नामदेव, महाकालेश्वर सोसायटीमधील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आ. संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, अँड. राजेश कातोरे, ज्ञानदेव कापडे,बाळासाहेब कोलते, भाऊसाहेब आंबेडकर, सुनीता साळवे, राणी शेकटकर, सुरेखा काळे, रमेश वाकळे, आदिनाथ सातपुते, बाळासाहेब गायकवाड, जालिंदर घोलप, संपत साबळे, विलास ढाकणे, वामन साळवे, शिवराम पवळे, सुरेश पवळे, रियाज शेख, राजू काळे, सुदर्शनबनसोडे, सुदाम गावडे, अरुण माळी, अशोक भडके, गहिनीनाथ लोळगे, अरविंद महाजन, डी. एस. जाधव, डॉ. लालासाहेब पाचपुते, अनिता महाजन, गणेश गवंडी, बापू धाकतोंडे, विलास कांबळे, प्रकाश धाडगे, सुमंत जाधव, प्रकाश नाईक, बापू शेळके, तसेच या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महापौर वाकळे म्हणाले की, विकासकामे करणारा नगरसेवक तुम्ही निवडून दिल्यामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळाली आहे.

Also see this and subscribe 

या भागात मुलभूत प्रश्नापासून प्रश्न सोडविण्याचे काम करावे लागत आहे. राष्ट्रवादीने विकासाच्या मुद्यावर भाजपाला पाठिंबा दिलाआणि आम्ही विकासकामे करून दाखविली. महापालिकेच्या माध्यमातून या भागाला मोठा विकासनिधी दिलेला आहे. यापुढील काळातही याभागाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे ते म्हणाले. यावेळी नगरसेवक वाकळे म्हणाले की, नंदनवन कॉलनी व राजमाता कॉलनीच्या विकासकामांसाठी नेहमीच आम्हाला संघर्ष करावा लागला. आंदोलने, उपोषण करावी लागली. १४ वर्षे या भागाला पिण्याचे पाणी नव्हते, ते मिळवून देण्यासाठी आ. संग्राम जगताप यांनीप्रयत्न केल्यामुळेच या भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला. या भागाच्या विकासाचे नियोजन केल्यामुळे टप्प्याटप्प्याने विकास कामे मार्गी लावली. आज अंतर्गत सर्व रस्ते काॉँक्रिटीकरणाने जोडले आहेत. पुढील काळात प्रभाग हा समस्यामुक्त करण्याचा मानस आहे. आ. जगताप व महापालिकेच्या माध्यमातून मोठा विकासनिधी मिळाल्यामुळेच बोल्हेगाव व नागापूरला शहरीकरणाचे रुप मिळाले. विकासकामे केल्याबद्दल या भागातील नागरिकांनी आमचे जल्लोषात स्वागत केले. ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी केली. सडा, रांगोळ्यांनी कॉलनी सजविल्या, फुग्यांच्या माळा लावल्या, फुलांचा वर्षाव केला. यामधूनच असे समजते की, विकासकामांना महत्त्व किती आहे हे सिद्ध होते. विकासकामांमुळे जिव्हाळ्याच नाते निर्माण होते, असे ते म्हणाले.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.