नगरच्या रस्त्यांसाठी विक्रम राठोड यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे ; रस्त्यांसाठी मागितला ३५० कोटींचा निधी

रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत युवा सेनेच्या शिष्टमंडळाची उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत सविस्तर चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर शहरातील रस्त्याची परिस्थिती सुधारविण्यासाठी सेनेचे माजी नगरसेवक विक्रम राठोड यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे ३५० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली.

शहरातील उखडलेल्या रस्त्यांची समस्या खूप मोठी आहे. वर्षानुवर्षे नगरकर या समस्येबाबत नरकयातना भोगत आहेत.

शहरातील रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी सोडविणे खूपच अत्यावश्यक आहे.

यासाठी नगर शहरातील शिवसेनेच्यावतीने माजी नगरसेवक विक्रम राठोड यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते.

माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे हे त्यांच्यासमवेत होते.

नगर शहरातील रस्त्याची कामे निधी अभावी रखडलेली असून त्यासाठी ३५० कोटी रुपये इतक्या मोठ्या निधीची गरज आहे ही मागणी त्यांच्याकडे नोंदविण्यात आलीये तेव्हा लवकरच शहरातील डी पी रस्त्यासाठी भरीव मोठा निधी दिला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

नगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. स्व . आ. अनिल भैय्या राठोड यांची जनतेशी घट्ट पकड होती. त्यांच्या विचार आणि कार्यावर आधारित काम करून नगर शहर शिवसेनेतील युवा सदस्यांची पक्ष वाढीस चालना द्यावी.

अशी सूचना शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी केली आहे.

नगर शहरातील पक्षाचे संघटन कार्य व शहरातील विविध प्रलंबित प्रश्न याबाबत चर्चा यावेळी झाली.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर या शिष्ट मंडळाची उद्धव साहेब ठाकरे यांची भेट झाली.

नगर शहरातील पक्ष संघटना वाढ आणि शहराचे विविध प्रलंबित प्रश्न , खुंटलेला विकास याबाबत उद्धव ठाकरे यांनी याबाबत नगर शहर शिवसेनेतील युवा वर्गाची मते जाणून घेतली.

नगर महानगर पालिकेत आपली सत्ता आहे याद्वारे नगर शहराचा मोठा विकास करण्याची संधी शिवसेनेला मिळाली आहे.

या संधीचे सोने करण्यासाठी सेनेतील युवा वर्गाने पुढाकार घ्यावा .

जिथे कुठे अडचण येईल त्या ठिकाणी मी जातीने लक्ष घालून प्रश्न मार्गी लावेल.

पक्ष संघटना बळकट करण्याची आणि सत्तेच्या माध्यमातून नगर शहरातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न , समस्या सोडवून घेण्याची हीच ती वेळ आहे.

पक्ष संघटनेत धडाडीने काम करणाऱ्या सेनेतील युवा वर्गाने यासाठी पुढे यावे आणि योगदान द्यावे.

शहरात स्व. आमदार अनिल भैय्या राठोड यांच्याप्रमाणे सामान्य जनतेचे शिवसेनेशी नाते घट्ट कसे राहील याची जबाबदारी युवा वर्गाने स्वीकारावी अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली.

शहर विकासाच्या बाबतीत सरकार आग्रही असून नेमकी अडचण सोडवून त्यातून मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.