
Breaking Election Buzz | राहुल गांधींना आयोगाची ७ दिवसांची डेडलाईन! 
दिल्ली :
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मतदारयादीतील घोळ व निवडणूक आयोगावर केलेले गंभीर आरोप आता मोठ्या वादाला तोंड फोडत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी थेट राहुल गांधींना आव्हान दिलं आहे
“तुमच्याकडे पुरावे असतील तर ७ दिवसांत शपथपत्रासह द्या, अन्यथा संपूर्ण देशाची माफी मागावी लागेल.” 
निवडणूक आयोगाचं स्पष्ट मत:
- “मतदारयादीत सुधारणा झाली असेल, पण बूथ पातळीवर आमचे अधिकारी एजंट्स आणि राजकीय पक्षांसह काम करतात.”
- “राहुल गांधींनी पीपीटी दाखवली, पण त्यात आकडेवारी नव्हती. चुकीच्या पद्धतीने माहिती दिली.”
- “दोनदा मतदान झाल्याचा आरोप गंभीर आहे, पण शपथपत्राशिवाय कारवाई शक्य नाही.”
- “एकाच व्यक्तीने दोनदा मतदान करणे हा कायदेशीर अपराध आहे.”
![⚖️]()
राहुल गांधींवर थेट दबाव:
राहुल गांधी यांचं नाव न घेता ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं 
“सर्व मतदारांना दोषी ठरवणं आणि आयोग मौन बाळगेल, हे शक्य नाही. त्यांनी शपथपत्र द्यावं, अन्यथा देशाची माफी मागावी लागेल. यात तिसरा पर्याय नाही.”
आता राहुल गांधींसमोर दोनच रस्ते उरले आहेत –
शपथपत्रासह पुरावे सादर करणे
देशाची माफी मागणे 
आयोगाचा दमदार दावा:
- भारतात ९०-१०० कोटी लोकांची मतदारयादी आहे.
- जगातील सर्वात मोठी मतदारयादी आणि सर्वात मोठा निवडणूक कर्मचारी वर्ग भारताकडे आहे.
- ६०% हून अधिक मतदान भारतात होतं, हेच लोकशाहीचं बळ आहे.
![🇮🇳]()
पॉलिटिकल इम्पॅक्ट:
हा वाद आता केवळ काँग्रेस-आयोगापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर देशभरात मोठं राजकीय तापमान चढवलं आहे. राहुल गांधी पुढील ७ दिवसांत काय भूमिका घेतात यावर राजकीय समीकरणं बदलू शकतात. 
#ElectionCommission #RahulGandhi #BreakingNews #MetroPortal #PoliticalBuzz

