निवडणूक आयोग वि. काँग्रेस युध्द उफाळलं!
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा जोरदार हल्लाबोल:

Political Blast | निवडणूक आयोग वि. काँग्रेस युध्द उफाळलं! 
दिल्ली :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर रविवारी आयोगानं पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं. आयोगानं स्पष्ट केलं
“आमच्यासाठी सर्व पक्ष सारखेच आहेत. आम्ही कोणताही भेदभाव करत नाही. लोकांची दिशाभूल करणे हा संविधानाचा अपमान आहे. आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण बंद करा.” 
पण आयोगाच्या या पत्रकार परिषदेनंतर वातावरण आणखीच तापलं आहे. 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा जोरदार हल्लाबोल:
“आयोगानं इज्जतीची लक्तरं टांगली आहेत! पत्रकार परिषद हा केविलवाणा प्रयत्न होता. आकडेवारीसह उत्तर द्यायला हवे होते, पण आयोग फक्त स्क्रिप्ट वाचत होता. रविवारी घाईघाईत पत्रकार परिषद का बोलावली?” असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. 
ते पुढे म्हणाले 
- राहुल गांधी यांनी मतांची चोरी चव्हाट्यावर आणली आहे.
- आयोगानं भाजपने लिहून दिलेली स्क्रिप्ट खाली मान घालून वाचली.
- पत्रकार परिषदेमधून आयोगानं फक्त नाटक केलं, आणि पुन्हा एकदा तोंडघशी पडलं.
- आज आयोगाला कदाचित सांगण्यात आलं की राहुल गांधींची बिहारमध्ये यात्रा आहे, ती थांबवा.
![😠]()
मतांची चोरी सिद्ध?
सपकाळ यांनी ठामपणे म्हटलं की
“राहुल गांधींनी मतांची चोरी पुराव्यानिशी दाखवली. ही माहिती स्वतः आयोगाच्या दस्तावेजांत आहे.”
मतदार स्थलांतरामुळे नावं गायब होतात हा आयोगाचा दावा देखील सपकाळ यांनी फेटाळून लावला आणि त्याला “आयोगाचा बेशरमपणा” म्हटलं. 
पॉलिटिकल इम्पॅक्ट:
या आरोप-प्रत्यारोपामुळे महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. एकीकडे आयोग निष्पक्षतेचा दावा करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस “मतांची चोरी” या मुद्यावर आक्रमक झाली आहे.
आगामी दिवसांत हा मुद्दा सोशल मीडिया ते संसद सर्वत्र पेटणार हे निश्चित!
#ElectionCommission #Congress #RahulGandhi #HarshvardhanSapkal #MetroPortal #BreakingPolitics
