#JusticeForSomnath | सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका सरकारला!
आता सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं – "पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!"

परभणी – संविधान प्रतीकेची विटंबना, आंदोलक अटकेत, आणि त्यातूनच न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या विधीविद्यार्थ्याचा मृत्यू.
आता सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं – “पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”
राज्य सरकारने हा निर्णय रोखण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. पण, SC ने अपील फेटाळलं आणि औरंगाबाद खंडपीठाचा निकाल कायम ठेवला आहे. 
सोमनाथच्या आई – विजयाबाई – यांची कोर्टात थेट लढाई, कोर्टानं घेतली दखल, पोलिस अधीक्षकांना आदेश – “FIR नोंदवा. तपास SDPO करेल.”
या प्रकरणात आधीच ४ पोलिस सस्पेंड झाले आहेत.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर ही माहिती शेअर करून समाजाला दिला न्यायाच्या लढ्याचा संदेश.
“कोणत्याही तरुणाचं स्वप्न अशा प्रकारे संपणं – हे समाजाचं अपयश आहे. पण आता न्यायाच्या दिशेने मोठं पाऊल उचललं गेलं आहे.” 

#SomnathSuryawanshi
#JusticePrevails
#SCVerdict
#PoliceAccountability
#ParbhaniCase