आनंदीबाजार तोडफोड प्रकरणावर खासदार नीलेश लंके आक्रमक – SP ला भेटून सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी! 🚨
अहिल्यानगर शहरातील आनंदीबाजार परिसरात सय्यद घोडेपीर दर्ग्याच्या चौथऱ्यावर अज्ञात दंगेखोरांनी तोडफोड केली.
Share
BREAKING | आनंदीबाजार तोडफोड प्रकरणावर खासदार नीलेश लंके आक्रमक – SP ला भेटून सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी!
रविवारी पहाटे अहिल्यानगर शहरातील आनंदीबाजार परिसरात सय्यद घोडेपीर दर्ग्याच्या चौथऱ्यावर अज्ञात दंगेखोरांनी तोडफोड केली. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
ही घटना जिल्ह्यातील सामाजिक सलोखा व बंधुत्वाला धक्का देणारी असल्याचे सांगत खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेतली. त्यांनी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
खासदार लंके यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे, अथर खान, प्रा. सीताराम काकडे, नलिनी गायकवाड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
लंके यांचे निवेदन
सय्यद घोडेपीर दर्गा हे शेकडो वर्षांपासून दोन्ही समाजांचे सामूहिक श्रद्धास्थान आहे. अशा पवित्र स्थळी झालेली तोडफोड ही असामाजिक प्रवृत्तींचा सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असले तरी चौकशी गतीने करून कठोर कारवाई केली पाहिजे. राहुरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरण अद्याप निकालात न लागल्याने अस्वस्थता आहे. सलग घडणाऱ्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रमुख मागण्या
आनंदीबाजार तोडफोडीची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा करावी राहुरीतील शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी कायद्याच्या चौकटीत ठोस उपाययोजना करावी संवेदनशील भागात युद्धपातळीवर पोलीस बंदोबस्त ठेवावा उत्सव काळात सतत गस्त, महिला सुरक्षेसाठी विशेष पथके, सोशल मीडिया मॉनिटरिंग वाढवावे दोन्ही समाजातील प्रतिनिधींशी संवाद साधून अफवांना आळा घालावा
शांततेचे आवाहन
खासदार लंके यांनी स्पष्ट केले की, अहिल्यानगर जिल्हा हा शांतता व बंधुत्वाचा आदर्श आहे. काही असामाजिक प्रवृत्ती वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्या तरी नागरिकांनी संयम राखावा, अफवांना बळी पडू नये व कायद्यावर विश्वास ठेवावा.
आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तणाव नियंत्रणात आणणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आनंदीबाजार, चितळे रोड, तेलीखुंट, मुकुंदनगरसह संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त ठेवावा, अशी ठाम मागणी खासदार लंके यांनी केली आहे.
Metro News चे आवाहन : नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखावी आणि कायद्याला सहकार्य करावे. दोषींवर निश्चित कठोर कारवाई होईल!