शेतकऱ्यांचे आंदोलन हुकूमशाहीने दडपण्याचा प्रयत्न

नगर-पुणे महामार्गावर चक्काजाम आंदोलन

अहमदनगर :   दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांहून अधिक कालावधीपासून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांची दखल न घेता त्यांचे आंदोलन हुकुमशाहीने दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा निषेध नोंदवून अ.भा.किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने शहरातील मार्केटयार्ड चौकात नगर-पुणे महामार्गावर चक्काजाम आंदोलन हुकुमशाहीने दडपण्याचा प्रयत्न करण्यात आले. केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारच्या विरोधात जोदराद घोषणाबाजी करुन नव्याने पारीत केलेले शेतकरी विरोधी असलेले तीन नवीन कृषी कायदे, वीज बिल विधेयक 2020 तसेच कामगार विरोधी संहिता रद्द करण्याची यावेळी मागणी करण्यात आली.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.

Also See this and subscribe 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

यामध्ये हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड.कॉ.सुभाष लांडे, आर्किटेक अर्शद शेख, युनूस तांबटकर, कॉ.प्रा.डॉ.महेबुब सय्यद, अंबादास दौंड, कामगार संघटना महासंघाचे भैरवनाथ वाकळे, किसान सभेचे धोंडीभाऊ सातपुते, सिंधूबाई त्रिमुखे, बाळासाहेब पवार, विष्णू म्हस्के, संध्या मेढे, बाळासाहेब सागडे, वैभव कदम, अब्दुल गनी शेख, भाऊसाहेब थोटे, रविंद्र फुलसौंदर, कार्तिक पासळकर, दिपक क्षीरसाठ, राजेंद्र कर्डिले, रवी सातपुते, शाहीर कान्हू सुंबे, दिलीप घुले, शकील शेख आदी विविध पक्षाचे व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.  अ‍ॅड.कॉ.सुभाष लांडे म्हणाले की, नव्याने पारीत करण्यात आलेले नवीन कृषी कायदे शेतकर्‍यांना देशोधडीस लावणारे आहे. न्याय, हक्काच्या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांचे आंदोलनाला बदनाम करुन केंद्र सरकार दडपशाही करत आहे. कॉ. महेबुब सय्यद म्हणाले  केंद्र सरकार मात्र शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत पाहत आहे. 

 

 अविनाश घुले यांनी देशातील शेतकर्‍यांचे आंदोलन हुकुमशाहीने दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने शेतकर्‍यांचा हा उद्रेक आहे, असे परखड मत स्पष्ट केले. कॉ. अर्शद शेख यांनी अन्याय, अत्याचार विरोधात आवाज उठवले तर सरकार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करते. देशद्रोहाची व्याख्या नेमकी तपासून घ्यावी लागणार आहे.  या आंदोलनाने  केंद्रातील भाजप सरकारच्या हुकुमशाहीने लोकशाहीला धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रातील भाजप सरकार विरोधात घोषणा देत आंदोलकांनी रस्त्यावर येऊन ठिय्या मांडला. रास्तारोको करणार्‍या आंदोलक नेत्यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन रस्ता रहदारीस मोकळा करुन दिला. 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.