नागपंचमी यात्रा पूर्वी शांतता बैठक!
जामखेडमध्ये प्रशासन, राजकीय नेते आणि संघटनांची संयुक्त तयारी
नागपंचमी यात्रा पूर्वी शांतता बैठक!
जामखेडमध्ये प्रशासन, राजकीय नेते आणि संघटनांची संयुक्त तयारी

शहराच्या ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यांची नागपंचमी यात्रा यंदा मोठ्या दिमाखात पार पडणार असून, त्याआधीच प्रशासनाने पुढाकार घेत शांतता समितीची बैठक आयोजित केली.
बैठकीत तहसीलदार गणेश माळी यांच्या अध्यक्षतेखाली नागेश्वर पालखी मार्ग, आनंद मेळा, वाहतूक नियोजन, स्वच्छता, महिला सुरक्षेसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
प्रा. मधुकर राळेभात (भाजप) यांनी सांगितलं की, यात्रेत ५-७ दिंड्या आणि मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे ट्रॅफिक नियोजन, खड्डे बुजवणे, अर्धवट पाइपलाइन काम थांबवणे गरजेचं आहे.
शरद कार्ले (बाजार समिती सभापती) म्हणाले, “आनंद मेळा बाजार समिती आवारात भरवण्यात यावा. पाणी, स्वच्छता, सुरक्षेची पूर्ण व्यवस्था देण्यात येईल. दर निश्चितीसाठी व्यापाऱ्यांसोबत प्रशासन समन्वय साधेल.”
उपस्थित अन्य मान्यवरांचे महत्त्वाचे मुद्दे:
- मोकाट जनावरांवर नियंत्रण
- महिला शौचालयांची व्यवस्था
- अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई
- मेळ्यातील खेळण्यांचे दर कमी करावेत
- मोबाईल/दागिने चोऱ्यांवर लक्ष
- पालखी मार्गावर CCTV कॅमेरे सक्रिय करावेत
- शाळेसमोर मुलं गोळा होणाऱ्या दुकानांवर कारवाई
- शाळेच्या वेळात पोलीस गस्त वाढवावी
- आनंदनगरीत पाण्याचे टँकर ठेवावेत
नागपंचमी यात्रा ही श्रद्धेचा विषय असला तरी सुरक्षिततेचं भान आवश्यक!
सर्वांच्या सहभागातून यंदाची यात्रा अनुशासनबद्ध, सुरक्षित आणि संस्मरणीय होईल अशी अपेक्षा!