संजय राऊत यांनी आता थांबलं पाहिजे : दीपाली सय्यद

अहमदनगर : मेट्रो न्यूज 

तालुक्यातील साकळाई योजनेसाठी सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांनी उपोषण केले होते, त्यासाठी त्यांनी लढा दिला होता. या योजनेच्या सर्व्हेसाठी नुकतीच परवानगी मिळाली आहे,  दीपाली सय्यद म्हणाल्या ,आपल्याला अतिशय आनंद होतो की, गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेसाठी सर्वच लोक‌ प्रयत्नशील होते आणि त्या योजनेचं काम सुरू होतय त्याचा आनंद होतोय.

तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील आभार मानले आहे. दीपाली सय्यद यांनी अहमदनगर मधून लोकसभा निवडणूक लढवली होती. पत्रकारांच्या ” पुन्हा अहमदनगरमधून उमेदवारी करणार का?” या प्रश्नावर बोलताना ,लवकरच काहीतरी ट्विस्ट झालेला तुम्हाला दिसेल आसं  त्या म्हणल्या .

त्याचप्रमाणे शिवसेना खासदार (ठाकरे गट)  संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोर म्हटलं होतं ,आस पत्रकारांनी विचारले असता ,  दीपाली सय्यद यांनी  , संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली .जेवढी बग बग करायची होती ती सगळी झालेली आहे, आणि मला असं वाटतं की कुठेतरी ही बग बग थांबली गेली पाहिजे…कारण आपल्या डोळ्यासमोर सगळं काही तुटलेलं आपण पाहिलं आहे.तुम्ही जेलमध्ये जाऊन आलात, आल्यानंतर तुम्ही पुन्हा तेच करताय… मला असं वाटतं , कुठेतरी थांबा आणि आता आपल्या महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी सगळ्यांनी एकत्र काम करा ,असं दीपाली  सय्यद यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे.