मराठवाड्याला दिलासा! यंदा पाण्याची चिंता नाही – पण वापर सुज्ञपणे करा: राधाकृष्ण विखे पाटील

"यंदा मराठवाडा वणवण भटकणार नाही, पाणी भरपूर आहे... पण ते जपून वापरलं पाहिजे!" – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा स्पष्ट संदेश.

🚨
 मराठवाड्याला दिलासा! यंदा पाण्याची चिंता नाही – पण वापर सुज्ञपणे करा: राधाकृष्ण विखे पाटील 🚰

📍 पैठण – जायकवाडी धरण जलपूजन सोहळा

“यंदा मराठवाडा वणवण भटकणार नाही, पाणी भरपूर आहे… पण ते जपून वापरलं पाहिजे!” – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा स्पष्ट संदेश.

🔹 पैठणच्या जायकवाडी धरणात ९१.७८% पाणीसाठा
🔹 मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन आणि १८ दरवाजे उघडून ९,४३२ क्युसेक विसर्ग सुरू
🔹 गोदावरी नदीच्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
🔹 वरून अजूनही येतंय १३,९७० क्युसेक पाणी

🎤 “गोदावरीच्या कृपेमुळे सुजलाम-सुफलाम मराठवाडा; हे शक्य केलं शंकरराव चव्हाणांनी!” – विखे पाटील यांचा गौरवोद्गार

🕉️ वेदपाठ, मंत्रोच्चार, जलपूजन सोहळ्याला मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती

 

✅ जायकवाडी धरण भरल्यामुळे आता मराठवाड्याला दिलासा मिळालाय, पण पाणी फुकट घालवू नका – असं स्पष्ट आवाहन सरकारकडून!