राज्यातील सर्व मंदिरे बंद असल्याने अण्णा हजारे संतापले

मंदिरे न उघडल्यास रस्त्यावर उतरू - अण्णांचा सरकारला इशारा

अहमदनगर (संस्कृती रासने)

 

मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून करोना वाढत नाहीये का ? जेथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले? असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संतापले. मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे. मंदिर बचाव कृती समितीने यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल. सरकारचे धोरण बरो बर नाहीये. १० दिवसांत जर मंदिर उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही ते मोठे जेल भरो आंदोलन करा, मी तुमच्या बरोबर राहील, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला.

 

   नगरच्या मंदिर बचाव कृती समितीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी येथे भेट घेऊन राज्यातील बंद असलेनी सर्व मंदिरे उघडण्यासाठी सरकार कडे पाठपुरावा करावा असे साकडे घातले. मंदिर बचाव कृती समितीचे प्रमुख वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, विशाल गणपती मंदिर ट्रस्टचे ऍड.अभय आगरकर, शिर्डी देवस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, श्री शिव प्रतिष्ठान चे बापू ठाणगे, बाळासाहेब खता डे, गणेश पलंगे आदी उपस्थित होते.

 

 

 

 

     अण्णा हजारे पुढे म्हणाले, भरकटत चाललेल्या समाजाला फक्त मंदिरेच तारू शकतात यावर माझा विश्वास आहे. मी आज जे काही आहे ते केवळ मंदिरामधून मिळालेल्या संस्कारांमुळेच आहे. आज ८४ वय झाले आहे. मात्र माझ्यावर एवढासाही डाग नाही. हा मंदिरातून मिळालेल्या संस्कारांचा परिणाम आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या समाधी जवळ जाऊन तुळशीची माळ घालून वारकरी झालो. संतांचे विचार देणारे मंदिरे का बंद केली. सरकारला संतांचे विचार काय समजले? त्यामुळे सरकारने आपले धोरण बदलावे व त्वरित मंदिरे उघडावीत.
        वसंत लोढा यांनी यावेळी मंदिर बचाव कृतीसमितीने यापूर्वी केलेल्या विविध आंदोलनाची माहिती देऊन पुढील काळात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली उग्र आंदोलन करण्यात येईल, असे सांगितलं.