ग्रामीण विकास केंद्र संचालित ‘आईच घर’ या नूतन वास्तूच्या कामाचे भूमिपूजन.

निवारा बालगृहात मुलांचे भविष्य उज्वल :- पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड

अहमदनगर (ऋषिकेश राऊत)

 

                            समाजामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसावा व त्यांची फरफट थांबावी, आत्महत्येस प्रवृत्त होण्यापासून त्यांना वाचवावे यासाठी ग्रामीण विकास केंद्र संचलित ‘निवारा बालगृह’, समता भूमी येथे ‘आईचं घर’ या नूतन वास्तूच्या कामाचा भूमिपूजन सोहळा जामखेडच्या पंचायत समितीच्या सभापती राजबीताई सर्वकांत मोरे, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, ह.भ.प कांताताई महाराज सोनटक्के, पत्रकार किशोर आखाडे यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी बोलतांना पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड म्हणाले की, निवारा बालगृह येथे निश्चितच मुलांचे भविष्य उज्वल घडत आहे. त्यांची शैक्षणिक व कलात्मक प्रगती थक्क करण्याजोगी आहे. विद्यार्थ्यांना भारतासहित जागतिक घडामोडींचा मोठा अभ्यास आहे. त्यामुळे बालगृहातील विद्याथ्र्यांचे भविष्य उज्वल आहे. भविष्यात बालगृहातील विद्यार्थी मोठ्या पदावर असतील असही ते म्हणाले.

 

 

 

अॅड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, ग्रामीण विकास केंद्र जामखेड संचलित निवारा बालगृह  हे अनाथ, निराधार, वंचित, लोककलावत वीटभट्टी कामगार, ऊसतोड मजूर, भटके विमुक्त, आदिवासी घटकातील ७० मुला मुलींच्या शिक्षणासाठी हे बालगृह आहे. लोकवर्गणीतून हे बालगृह चालवले जात आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आईच घर या प्रकल्पाच्या वास्तूच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. निंबळक येथील कृष्णा रामभाऊ खेडे, गोरख मानुदास राऊत अशोक मुसमाडे यांनी बालगृहातील मुलांना महिनाभर एवढे व अन्नधान्य दिले. गोरख राऊत यांनी रोख स्वरूपात देणगी दिली. पारिजात इंडस्ट्रीजचे अजिंक्य मेहत्रे, विश्वनाथ काळे संदीप कचरे यांनी बालगृह मुलांना चादरी दिल्या. ज्योती ठाकरे यांनी मास्कचे वाटप केले.

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा. 

 

 

निवारा बालगृहातील विद्यार्थिनी गीता बर्डे व शिवानी शिंदे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले. वैजिनाथ केसकर यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास मोहाचे उद्योजक शिवाजी डोंगरे, लोकाधिकार आंदोलन संघटनेचे प्रवक्ते बापू ओहोळ, संस्थेच्या सचिव उमाताई जाधव, वंचीत आघाडीचे तालुकाध्यक्ष अतिश पारवे, लोकाधिकारच्या महिला जिल्हाध्यक्ष द्वारका पवार, सचिन भिंगारदिवे, वैजीनाथ केसकर, विराल पवार, भीमराव चव्हाण, मच्छिंद्र जाधव, अजिनाथ शिंदे, संतोष शेगर दादा शिंदे, राजू शिंदे, तुकाराम पवार, शंकर सावंत करण आल्हाट, वैशाली मुरूमकर, नंदकुमार गाडे, संजय तुपे, संगीता अलंकार, तुकाराम शिंदे, डिसेना पवार, काजोरी पवार, सविता शिंदे, कोमल जाधव, शारदा लोंढे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.