महावितरणकडून चाललेली जनतेची अडवणूक थांबवावी

अन्यथा भाजप च्या वतीने महावितरण कार्यालयावर आसूड मोर्चा

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

महावितरण विभागाकडून नगर तालुक्यातील जनतेची जाणूनबुजून होत असलेली अडवणूक ८ दिवसांच्या आत थांबवावी अन्यथा भाजपा नगर तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर भव्य आसूड मोर्चा काढण्यात येईल असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी आज महावितरण कार्यालयास दिला. यावेळी बोलताना कोकाटे यांनी सांगितले की, गेल्या कित्येक दिवसांपासून महावितरण विभागाने कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता तालुक्यातील जनतेची जाणूनबुजून अडवणूक चालवली आहे.

 

 

एखादे रोहित्र जळाले की शेतकऱ्यांना थकीत वीज बिल भरा तरच  रोहित्र  बदलून दिले जाईल असे सांगून अडकवून ठेवले जाते. कोरोना सारख्या परस्थिती मध्ये सर्व आर्थिक परिस्थिती कोलमडलेली असताना महावितरण कडून वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. सांडवा, पिंपळगाव लांडगा, जेऊर परिसरातील रोहित गेल्या २-३ महिन्यापासून जळालेले असताना देखील अद्यापपर्यंत ते बदलून भेटलेले नाहीत. ही अत्यंत निंदनीय बाब आहे. भाजपा नगर तालुक्याच्या वतीने याबाबत अनेक वेळा निवेदन दिलेले आहे परंतु महावितरणने गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळेच येत्या ८ दिवसात महावितरणने तालुक्यातील जनतेची जाणूनबुजून होत असलेली अडवणूक थांबवावी अन्यथा भाजपा नगर तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर भव्य आसूड मोर्चा काढण्यात येईल असे प्रतिपादन यावेळी कोकाटे यांनी केले.

 

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा.

 

 

 

 

यावेळी जेष्ठनेते रभाजी सुळ, दरेवाडीचे सरपंच सुभाष बेरड, दशमी गव्हाचे सरपंच बाबासाहेब काळे, तालुका सरचिटणीस गणेश भालसिंग, बाप्पूसाहेब बेरड, तालुका उपाध्यक्ष प्रशांत गहिले, राजेंद्र दारकुंडे, पोपट शेळके, सागर भोपे, बबन शिंदे, महेश लांडगे, गोवर्धन शेवाळे, विजय गाडे, भाऊसाहेब बेल्हेकर, संतोष कोकाटे, बाप्पूसाहेब कोकाटे यांच्यासह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.