मुंबईसह राज्यभर थंडीची लाट

थंडीच्या हंगामाला जोरदार  सुरुवात  

मुंबई :

 

नोव्हेंबर महिना सुरु झाला कि माणसे थंडीने कुडकुड  करायला लागतात.  महाराष्ट्र राज्यातही आता थंडीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे.  भर दिवसाही मुंबई ,पुण्यासह अहमदनगरमध्ये शहरात जोरदार थंडी जाणवायला सुरूवात झाली आहे.

 

मंगळवारी मुंबईमध्ये हंगामातील आतापर्यंतचं सर्वात कमी किमान तापमान नोंदवलं गेलं आहे.  सांताक्रूझ वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि उपनगरांमध्ये 19.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.  तर आज बुधवारी मुंबईत 19.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

 

 मंगळवारी सकाळपासूनच ईशान्य दिशेने वेगाने थंड वारे वाहतील. यामुळे रात्रीच्या तापमानात घट होईल तर गुरुवारपासून वाऱ्याची दिशा पुन्हा बदलण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे.