पुण्यात धुडगूस घालणाऱ्या रानगव्याचा दुर्देवी मृत्यू…

पुणे : 

पुण्यात आज पकडलेल्या रानगव्याचा दुर्देवी मृत्यू झालाय.  रानगव्याला बेशुद्ध करण्यासाठी तीन वेळा इंजेक्शन देण्यात आले होते.  तब्बल सात तास हे रेस्क्यु सुरु होतं. रानगव्याच्या तोंडाला आणि पायाला लागलं होतं.  त्यामुळे रानगव्याच्या मृत्यूला जबाबदार कोण ? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

रानगवा महात्मा सोसायटीच्या भरवस्तीत घुसल्याने अनेकांची पळापळ झालेली कोथरुड परिरात पाहायला मिळाली होती. त्याला बघण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी केली होती.   वाट चुकलेला रानगवा महात्मा सोसायटीच्या परिसरात सुरुवातीला दिसला होता.  कोथरुड भागात आढळलेला रानगवा शहराच्या दिशेने पळाला होता.

वनविभागाला चकवा देत रानगवा पळाला त्यामुळे  ५० ते ६० जण गव्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते.  दाट लोकवस्तीच्या कोथरुड डेपो परिसरात रानगवा आढळून आला होता.   तो बिथरला असून पळतांना त्याच्या तोंडाला जखम झाली होती.  दरम्यान तो २० ते ३० मिनिटे सातत्याने पळत होता,  मात्र कुत्र्यांच्या हल्ल्यात हा रानगवा जखमी झाला आहे.  त्याला पकडण्यासाठी वनविभाग आणि महापालिकेचे पथकाने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले होते.  अखेर सहा तासांच्या नाट्यानंतर या रानगव्याला जेरबंद करण्यात यश आले होते.