दिसपूर :
आसामच्या बागजान क्षेत्रात गेल्या 150 दिवसांपासून लागलेली आग अजूनही सुरुच आहे. 9 जून रोजी एका भीषण गॅस स्फोटात आसाम सरकारच्या ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीच्या एका गॅस कंटेनरला आग लागली होती. 150 दिवसानंतरही इथं आगीच्या ज्वाला पाहायला मिळत आहेत. ही भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ भडकलेली आग बनली आहे.