नागालँड विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आनंदोत्सव….

कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवून केल्या विजयाच्या जोरदार घोषणा

अहमदनगर : मेट्रो न्यूज 

नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अधिकृत उमेदवार इम्तिचोबा व वाय. लिमा ओनेन चँग हे विजयी झाले आहेत.पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक ८ ठिकाणी  लढली आणि त्यात  २ उमेदवार विजयी झाल्याचा शहरात जल्लोष रंगला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दोन उमेदवार निवडून आल्याबद्दल शहरातील मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला, तर पक्षाच्या विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या.

या जल्लोषात रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, सरचिटणीस विजय भांबळ, ज्येष्ठ नेते संजय कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, योगेश त्रिभुवन, गणेश कदम, प्रा. विलास साठे, बापू जावळे, उत्कर्ष भालेराव, सुरेश पाटोळे, आदर्श साळवे, मंगला ठोंबे, कविता नेटके, आकाश भिंगारदिवे, गणेश कदम, बापू जावळे, संदेश पाटोळे, विशाल कदम, उत्कर्ष भालेराव, आदर्श साळवे, मंगला ठोंबे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जिल्हाध्यक्ष सुनील साळवे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार घेऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले मार्गक्रमण करत आहे. आंबेडकरी विचाराने देशाच्या कानाकोपर्‍यात सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम सुरु असून, संपूर्ण देशात रिपाई पक्ष वाढीचे काम सुरु झाले आहे. नागालँडमध्ये पक्षाला मिळालेले यश हे सर्व आंबेडकरी जनतेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.