सांगली जिल्ह्यात १ लाख पाच हजार टन बेदाण्याची विक्री

सांगली :

सांगली जिल्ह्यात १ लाख ५० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले असून, त्यापैकी १ लाख पाच हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे. फेब्रुवारी ते दि. २० ऑक्टोबर पर्यंत सांगली आणि तासगाव येथील बेदाणा सौद्यात १ हजार २५० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. सांगली जिल्ह्यात सध्या ४५ हजार टन बेदाणा शिल्लक आहे. अगोदर कोरोना आणि त्यांनतर परतीच्या पावसामुळे शेतकरी पूर्ण पणे अडचणीत आला आहे .

बेदाण्याला योग्य भाव मिळावा हीच माफक अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे. सांगली, तासगाव, पंढरपूर आणि विजापूर येथे बेदाण्याची मोठी उलाढाल होत असून , येथून देश आणि विदेशात बेदाणा पाठविला जात आहे. या हंगामात विजापुरातुन २५ हजार टन, पंढरपूरमधून ३० हजार टन आणि सांगली, तासगाव इथून १ लाख ५० हजार टन बेदाणा दाखल झाला होता.
त्यापैकी १ लाख पाच हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे. सांगली जिल्ह्यात सध्या ४५ हजार टन बेदाणा शिल्लक आहे. यापैकी सांगली, तासगाव येथील बेदाणा सौद्यामध्ये दि. २० ऑक्टोबरपर्यंत एक लाख पाच हजार टन बेदाण्याची विक्री झालीय . विक्री झाल्यानंतर अडते आणि व्यापारी यांच्यात जो खरेदी-विक्री व्यवहार झालेला असतो.त्या पैशाचा हिशोब करण्यासाठी दिनांक २१ ऑक्टोंबर ते २७ नोव्हेंबर या महिन्याच्या कालावधीत सौदे बंद आहेत. ४५ हजार टन बेदाणा शिल्लक आहे.उत्पादन वाढूनही दर चांगला मिळाला आहे.
कोरोनामुळे द्राक्षांची निर्यात झाली नाही त्यामुळे वीस ते तीस टक्के बेदाण्याचे जादा उत्पादन झालेआहे. . तरीही चांगल्या बेदाण्यास प्रतिकिलो १६५ ते २०० रुपये दर मिळालाय . दिवाळीत चांगली उलाढाल होईल.दिवाळीनंतर होणाऱ्या सौद्यात चांगला दर मिळेल,अशी अपेक्षा बेदाणा व्यापारयांनी व्यक्त केलीय .दरम्यान झिरो पेमेंट साठी 27 नोव्हेंबर पर्यंत सौदे बंद राहणार आहेत. परराज्यातील व्यापारयांकडून नेहमी शतकऱ्यांची फसवणूक होते असा अनुभव असल्यामुळे झिरो पेमेंट ही व्यवस्था निर्माण करण्यात आलीय .
झिरो पेमेंट म्हणजे शेतकऱ्यांचे अगोदरचे पूर्ण पैसे दिल्याशिवाय व्यापाऱ्यांना परत सौद्यात सहभागी करून घेतले जात नाही. त्यामुळे झिरो पेमेंट साठी 27 नोव्हेंबर पर्यंत सौदे बंद राहणार आहेत. सौदे बंद राहणार असले तरी सुद्धा बेदाण्याला या पेक्षा ही अधिकचा भाव मिळू शकतो असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.