भारत-पाक सीमेवर 60 किमी चे कुंपण

गृहमंत्री शाह: खुल्या जागा सुरक्षित करणार

पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून असलेल्या भारताच्या दोन प्रमुख सीमा येत्या दोन वर्षात पूर्णपणे सुरक्षित केल्या जातील. आणि या दोन्ही बाजूंच्या सुमारे 60 किमी अंतरातील मोकळ्या जागांवर कुंपण उभारण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री हमे तुषार यांनी शुक्रवारी दिले. सीमा सुरक्षा दलाच्या 59 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित पथसंचलनाची सलामी घेतल्यानंतर शाह बोलत होते. ‘केंद्रात सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने नऊ वर्षात भारत पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमेवरील सुमारे 560 किमी अंतरावरील कुंपण आणि अंतर भरून काढले आहे. भारताच्या पश्चिम आणि पूर्वेकडील या दोन सीमांमध्ये सर्व मोकळ्या जागा भरल्या जात आहेत. केवळ 60 किमी चे काम शिल्लक आहे.’ असे शाह या वेळ म्हणाले, सीमेवर अनेक ठिकाणी पाणी डोंगराळ आणि दलदलीचा भाग आहे. आणि येथे कुंपण घालणे खूप कठीण काम आहे. यावेळी गृहमंत्री म्हणाले की, देशात जेव्हा जेव्हा भाजप सरकार सत्तेवर आले, तेव्हा सीमा सुरक्षेला प्राधान्य दिले गेले. मग ते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असो किंवा मोदी सरकार आम्ही रेल्वे, रस्ते, जलमार्ग कनेक्टिव्हिटी आणि टेलिफोन संपर्क मजबूत केला आहे.