अहमदनगरमधील स्टेशनरोड परिसरातील सुभद्रा नगर, दौंड रोड या परिसरात झपाट्याने नागरिकीकरण होत आहे. शहरापासून थोडे बाजूला असल्याने या परिसरात नागरिक मोठ्या प्रमाणावर घरे बांधून राहायला येत आहेत. ह्या भागात नव्याने वस्ती होत असल्याने परिसरातील नागरिकांना रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत सुविधा लवकरात लवकर सुरु व्हाव्यात यासाठी शिवराष्ट्र सेना पक्षाच्या माध्यमातून महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन देण्यात आले.

